रविवार, 17 अगस्त 2008

शासकीय भूमिकेमुळे आयुर्वेदाची पीछेहाट दीर्घायु दिवाळी अंक -- 1994

शासकीय भूमिकेमुळे आयुर्वेदाची पीछेहाट
दीर्घायु दिवाळी अंक -- 1994

शासकीय भूमिकेमुळे आयुर्वेदाची पीछेहाट

दीर्घायु ९४ / १११

     आयुर्वेद म्हणजे भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी. असे असूनही आख पश्च्िामी देशांत आयुर्वेदाचे यश उदित होत असतानांच भारतात मात्र आयुर्वेदाला अजूनही दुय्यम स्थान आहे. तीच, किंबहुना त्याहूनही वाईट अवस्था निसर्गोपचाराची. याला शासनाची भूमिका आपल्या समाजाने स्वीकारलेला दृष्टिकोन हे दोन्ही जबाबदार आहेत. त्या दृष्टिकोनाचा उहापोह करणारा हा लेख.

     पण त्याआधी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान- सायन्स आणि टेक्नॉलॉजी आणि समाजाची प्रगती याबद्दल थोडी चर्चा करण्याची गरज आहे. विज्ञान म्हणजे कोणत्याही शास्त्राचे सैद्धांतिक विवेचन, त्या सिद्धांताची प्रयोगाबरोबर सांगह धालणे ते सिद्धांत अधिक प्रगल्भ करणे. तर तंत्रज्ञान म्हणजे या विज्ञानाचा प्रत्यक्ष व्यावहारात उपयोग करून त्यांच्याद्धारे जीवन सुलभ बनविणे समाजाची प्रगती घडवून आणणे. प्रत्येक तंत्रज्ञानाच्या पाठीशी विज्ञानाची बैठक असावी लागते आणि विज्ञानाच्या वाढीसाठी लागणास फीडबैक
तंत्रज्ञानाच्या व्यवहारातील वापरातून मिळत असतो. विज्ञान हे कांही लोकांपर्यंतच मर्यादित राहण्याची भिती असते. तंत्रज्ञान मात्र त्या तुलनेने चटकन सर्वापर्यंत पोचवता येते. असे ते जितके जास्त लोकापर्यंत पोचेल तितक्या मोठया प्रमाणांत विज्ञानासाठी लागणारा फीडबॅक मिळू शकतो. सामान्य जन वैज्ञानिक यांच्या मधला दुवा साधणारा घटक म्हणजे तंत्रज्ञान. याचे एक ताजे उदाहरण आपण पाहू या- पंजाबमधील कृषि विद्यापीठांने दर पंधरा दिवसांनी मिटींग ठरवून शेतकन्यांना विद्यापीठांत बोलावून, किंवा पत्राने त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यावर तत्काळ उतरे शोषली आणि पंजाबात शेतकरी लीकर प्रगत झाला, तसे इतरत्र घडले नाही हा संदर्भ पंजाब कृषि विद्यापीठाचे पहिले कुलगुरू श्री रंधावा यांच्याच तोडून मी ऐकला आहे. असो.

     भारतात ज्ञानाची समृद्धि आयुर्वेदाची प्रगति यांचा इतिहास बधितल्यास असे दिखते कि आयुर्वेद हे त्या काळातले तंत्रज्ञान होते त्याला लागणारी सैद्धांतिक किंवा वैज्ञानिक बैठक भारतीय दर्शन शास्त्र, विशेषतः सांख्य, न्याय, वैशेषिक यासारख्या घड्दर्शन शास्त्रांमधून वेदांमधून पक्की झालेली होती. आज पश्च्िामी देशांमध्ये असे मानतात कि फिजिक्स, केमिस्ट्री, बायलॉजी यासारख्या विषयांचा मूळ उद्गाता म्हणजे एरिस्टॉटल (खिस्तपूर्व सन २०० ते  ३०० या काळात) किंवा त्याचे समकालीन इतर दार्शनिक. थोडक्यांत ज्याला आज आपण बेसिक सायन्सेस म्हणतो त्यांची सुरूवात दोन ते अडीच हजार वर्षापूर्वीचीच आहे, असा दृष्टिकोन पश्च्िामी देशांनी मांडला पसरवला.

     आपण मान्य करू या कि त्यांना भारतातील ज्ञानाची परंपरा, इतिहास व्याप्त्िा माहीत नव्हती, म्हणून त्यांनी भारतीय दर्शनशास्त्रांमध्ये जे वैज्ञानिक विचार संदर्भ आहेत त्यांचा मागोवा घेताच विज्ञानाचा इतिहास लिहून काढला तो लिहीतांना विज्ञानाच्या वाढीत भारताचा कांहीही सहभाग (कन्ट्रीब्यूशन) नाही असे नमूढ करून ठेवले. पण आपण तरी त्यांना कधी त्यांची चूक दाखवली कां? किंबहुना ही त्यांची चूक आपल्याला कधी उमराली कां? पाच-सात हजार वर्षीपासून लिहीले खात असलेले आपले सांख्यादि यंश ही आद्य विज्ञानाची सुरूवात होती असे आपल्याला तरी कधी कळले किंवा पटले कां? आपण या सर्व दर्शनशास्त्राला आत्यंतिक अध्यात्माकडे नेणारे- व्यवहारात शून्य उपयोग असणारे- म्हणून अवैज्ञनिक- म्हणून टाकाऊ अशीच त्यांची संभावना केली. या सर्व यथांमधील तर्कशुद्धता, सिद्धांताची मांहणी, वैज्ञानिक दृष्टिकोन यांची दखल आपण घेतली नाही, या चुकीबदल पश्च्िामी इतिहासकारांना दोष देण्यांत अर्थ नाही. या ठिकाणी
हे लक्षांत ठेवायला हवे कि विज्ञांनात सिद्धांत मांडतांना तो तर्कशुद्ध असणे महत्वाचे असते- पुढे मागे तो चुकीचा असल्याचे ठरले तरी त्याचे वैज्ञानिक महत्व कमी होत नाही. सतराव्या शतकात न्यूटन ने सिद्धांत मांडला कि प्रकाश हा वेगाने जाणा-या कणांचा एक वाहता समूह असतो. त्याच्याच काळात हा सिद्धांत चुकीचा ठरवला जाऊन प्रकाश तरंग- स्वरूपी असतो हे मान्य झाले. आता विसाव्या शतकाच्या सुरूवातीला प्रकाशाचे तरंग स्वरूप असतेच पण त्याबरोबर त्याला कणाचेही स्वरूप असते असा सिद्धांत मान्य झाला आहे.

     याच तर्कशुद्धतेच्या निकषातून पाहिल्यास आपल्याला पटेल कि तीन-चार हजार वर्षापूर्वी ज्याला दर्शन शास्त्र म्हटले गेले त्यांत देखील आधुनिक फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी यांची बीजे होतीच. त्या सिद्धांतातून प्रकट झालेले तंत्रज्ञान म्हणजेच अर्थशास्त्र, आयुर्वेद, धनुर्वेद, स्थापत्य, ज्योतिष या सारखी शास्त्र. यापैकी आयुर्वेदाची व्याप्त्िा आणि विस्तार सर्वात जास्त टिकून राहिला. तसेच आपली उत्पादनावर भर असलेली एक अर्थव्यवस्था निर्माण झाली तीही टिकून राहिली. या दोन्ही शास्त्रांच्या व्याप्त्िाचे सूत्र होते- लोकाभिमुखता आणि विकेंद्रीकरण आयुर्वेदाची सामान्य सूत्रे ही आपल्या जीवन पद्धतीतील एक भाग बनून राहिली टिकली तसेच आपली विकेंद्रित अर्थव्यवस्था पण टिकली पसरली. ही शास्त्रे संपूर्णपणे विज्ञान किंवा तंत्रज्ञानाला
अनुसरून होती हे जर भारतीयांनाच मन्हपूर्वक पटले नाही, तर जग तरी त्यांचा स्वीकार कसा करणार? आणि भारतीयांना हे पटण्यासाठी त्या त्या शास्त्रांचा जो कांही अभ्यास आवश्यक आहे तो होऊ शकेल अशी आपली आजची शिक्षण व्यवस्था नाही.

     आता आपण सुमारे १७०० सना पासून ते सन २००० या ३०० वर्षाच्या कालावधीतील घटनांचा आयुर्वेदाच्या प्रगतीवर त्या घटनांचा कसा वाईट परिणाम झाला याचा थोडासा ऐतिहासिक आढावा घेऊ. सन १७०० च्या आसपास ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती झालेली नव्हती. ब्रिटनच्या दृष्टीने भारत हा व्यापारीदृष्टया अत्यंत पुढारलेला देश. फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल ह. अनेक देशही व्यापरा करण्यासाठी भारतात येत होते. संपूर्ण १७व्या-१८व्या शतकात फ्रान्स, इंग्लंड आणि युरोप येथे मोठमोठी युद्धे होत होती. १७५७ मध्ये प्लासीची लढाई झाल्यानंतर इंग्रजांनी मोठया प्रमाणावर भारतात आक्रमक भूमिका घेण्यास सुरूवात केली. इंग्रजांच्या हे लक्षात येऊन चुकले की त्यांची शत्रतास्त्रे भारतीय शस्त्रास्त्रांपेक्षा खूपच बरच्या दर्जाची होती. तसेच भारतीयांमध्ये थोडयाशा पैशांच्या लालसेने किंवा त्यांच्या घराघरात, जातीजातीत, भावाभावात फूट पाहणे सहज शक्य होते. अशा लालसेच्या बळावर घरातले भेदी शोधून इंग्रजांनी भारतावर मोठया प्रमाणावर विजय मिळवायला सुरवात केली. हा विजय मिळवताना इंग्रजांच्या असेही लक्षात आले की, या देशावर त्यांना राज्य करणे शक्य आहे या ठिकाणी फक्त आक्रमक लुटे-याची भूमिका घेता जर राज्यकर्त्याची भूमिका घेतली तर त्याचा दीर्घकालीन उपयोग होऊ शकेल. अशा भूमिकेसाठी मात्र राजाला थोडी न्यायप्रियता, थोडी शिख्त दाखवावी लागते, त्याचे राज्य समाजाला पोषक आहे, असे चित्र निर्माण करावे लागते. इंग्रजांना हे चित्र निर्माण करण्यात यश मिळाले. त्यानंतर इंग्रजांच्या असेही लक्षात आले की या देशाची एकूण आर्थिक व्यवस्था, उत्पादकता अतिशय जास्त आहे. इंग्लंडमध्ये १७५० ते १८०० या काळात जी एक औद्योगिक क्रांतीची चाहूल लागत होती, या चाहूलीच्या आधीचा इतिहास पाहिला तर भारतातील आर्थिक उत्पादकता ही इंग्लंडमधील आर्थिक उत्पादकतेपेक्षा जास्त होती. त्या काळची विकेंद्रीत उत्पादन-स्थळे कारागिरी शिकून घेण्याच्या परंपरागत पद्धती यांच्यामुळे भारतातील उत्पादनक्षमता जास्त होती. मात्र त्यामागील पाचशे ते हजार वर्षांचा काळ तरी  निदान असा होता कि जेंव्हा भारतात विज्ञानांत प्रगती झालेली नव्हती. एक प्रकारचे स्टेग्नेशन आलेले होते म्हणूनच आयुर्वेद किंवा अर्थशास्त्रांत देखील नवे संदर्भ किंवा नवे शोध लागत नव्हते. नवे लिखाण होत नव्हते. याउलट इंग्राजांकडे ज्या औद्योगिक क्रंातीची चाहूल लागत होती, त्यात द्मड़त्ड्ढदड़ड्ढ, द्यड्ढड़ण्ददृथ्दृढ़न््र चा भाग खूप मोठया प्रमाणावर होता, इंग्रजांकडे औद्योगिक क्रांति झाल्यानंतर त्यांना आपण जागतिक बाजारपेठ काबिज करावी आणि त्यासाठी भारतातील मूळ आर्थिक उत्पादकता कमी करणे गरजेचे आहे असे वाटू लागले. यासाठी
त्यांनी सर्व त-हेचे उपाय केले. जुलाहीची बोटे कापण्यासारखे उपायही करताना त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. हेतू हाच होता की येथील कुशल कामगारांचे परिवर्तन अकुशल कामगारांमध्ये व्हावे त्यांनी आपापल्या गांवी शेती करण्यासाठी परत जावे. याउलट ब्रिटिशांकडे जी नवीन औद्योगिक क्रांती उदयाला येत होती, नवीन समाजपद्धती निर्माण होत होती, त्यात 'ड़ड्ढदद्यद्धठ्ठथ्त्ठ्ठद्यत्दृद दृढ ड़ठ्ठद्रत्द्यठ्ठथ्' आणि 'क्ष्दढद्धठ्ठद्मद्यद्धद्वड़द्यद्वद्धड्ढ ढदृद्ध द्दद्वत्ड़त्त् ड़दृथ््रथ््रद्वदत्ड़ठ्ठद्यत्दृद' हे दोन महत्वाचे भाग होते. अशाच पद्धतीची अर्थरचना, आर्थिक व्यवस्था भारतात देखिल पुढेमागे निर्माण करता यावी या दृष्टीने ब्रिटिशांनी पावले उचलायला सुरवात केली. त्यामध्ये भारतात मोठया प्रमाणावर दळण-वळणाची साधने निर्माण करणे आणि मोठया प्रमाणावर 'द्वदत्ध्ड्ढद्धद्मठ्ठथ् ड्ढड्डद्वड़ठ्ठद्यत्दृद' निर्माण करून त्याद्धारे राज्यशासनाला प्रशासकीय कामाला उपयोगी पडेल अशी एक ड़थ्ड्ढद्धत्ड़ठ्ठथ् व्यवस्था निर्माण करणे उपयोगी ठरणार होते. यासाठी जी शिक्षणाची व्यवस्था १८५० पासून भारतात निर्माण व्हायला सुरूवात झाली त्या व्यवस्थेमध्ये इंग्रजांनी जाणीवपूर्वक जे काही विषय मागे ठेवले त्यात आयुर्वेद हा पहिला वळी ठरला. या देशातील आयुर्वेदाला नाहीसे करून नवीन ठ्ठथ्थ्द्रठ्ठद्यण्न््र द्मन््रद्मद्यड्ढथ््र  जी त्यांच्या देशात जन्माला येत होती तिचाच ड्ढड्डद्वड़ठ्ठद्यत्दृदठ्ठथ् द्रद्धदृढ़द्धठ्ठथ््रथ््रड्ढ मध्ये वापर त्यांच्या दृष्टीने योग्य मानला गेला. ते शिक्षण घेणा-याला मानमयतव, सरकार दरबारी नोकरी, ग्रॅण्टस्‌ असे नानाविध संकेत सुरू करून देशातील जास्तीत जास्त हुशार व्यक्तिंचा कल ठ्ठथ्थ्दृद्रठ्ठद्यण्न््र कडे वळवण्यामधे इंग्रजांना यश मिळाले.

     याचा अर्थ आयुर्वेदाचे जाणूनबुजून खच्चीकरण केले असाही होत नाही. कदाचित आयुर्वेदाबद्दल इंग्रजांना काहीही माहिती नव्हती. परंतु जे जे भारतीय ते ते अवैज्ञानिक अंधश्रद्धा पोसणारं, म्हणून त्याज्य आहे असे लोकांच्या मनावर बिंबवा, इंग्लंडमधून आलेले ज्ञानच फक्त वैज्ञानिक दृष्टया बरोबर आहे अशी लोकांची समजूत निर्माण करून द्या ही त्यांची काम करण्याची पद्धत होती. त्यामुळे शैक्षणिक व्यवस्थेत आयुर्वेद या विष्ज्ञयाचा पद्धतशीर अभ्यास होऊच शकला नाही. पुढे लोकमान्य टिळकांनी किंवा गुरूकुल कांगडी सारख्या संस्थेमधून या गोष्टीचा विचार करून आयुर्वेद ड़दृथ्थ्ड्ढढ़ड्ढद्म उघउण्यावर भर दिला. परंतु, तोपर्यंत थोडेफार नुकसान होऊन गेले होते.

     १९५० नंतर म्हणजे स्वातंत्रय मिळाल्यानंतर सरकारने या शिक्षण पद्धतीत तसेच आयुर्वेद एलोपथीबाबतच्या ब्रिटीशांनी ठरवून दिलेल्या मानदंडात काही बदल केला का? याचे उत्तर 'नाही' असेच द्यावे लागेल. ब्रिटिशांनी घालून दिलेली शिक्षणपद्धती सरकारने पुढे चालू ठेवली त्यामध्ये भारतीय प्रणाली काय आहे त्याचा भारतीयांनी अभ्यास कराव यादृष्टीने काहीही जाणीवपूर्वक प्रयत्न किंवा उपाययोजना केली गेली नाही. त्यामुळे साहजिकच जी व्यक्ती शैक्षणिक सत्रांमधून बाहेर पडली आहे. शिक्षित आहे, आणि म्हणून जिचा दृष्टिकोन वैज्ञानिक आहे असे गृहित धरले जाते किंवा जिला समाजात मान आणि आदर आहे या समळया व्यक्तिच्या मनात ठ्ठथ्थ्दृद्रठ्ठद्यण्न््र ही द्मड़त्ड्ढदद्यत्ढत्ड़ आणि आयुर्वेद हे द्वदद्मड़त्ड्ढदद्यत्ढत्ड़ हे तत्व संपूर्णपणे बिबवले गेले आहे. त्यामुळे आयुर्वेदाचा अभ्यास करणारा विद्यार्थी कनिष्ट तर आहेच शिवाय त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनही नाही असे मत निर्माण झाले आहे. उलगड़ा अजून ही झालेला नाही. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यानी आयुर्वेदावर काहीही बोलावे, संस्कृतमधून वाक्य वाक्य, ग्रंथ ग्रंथ उद्धृत करावे परंतु आजच्या आधुनकि युगातील विज्ञान-विषयांबदल एकही शब्द उच्चारू नये तो उच्चारला तर ती त्यांची अनधिकार चेष्ट असे समिकरण होऊन बसले. त्यामुळे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यानी ए.घ् चे उपकरण वापरले, ब्लड शुगर लेव्हल पाहिली की ब्रहमहत्या झाली असा एक समज तयार झाला. परिणामी आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा न्यूनपंड निर्माण झाला. आपल्याला आधुनिक फिजिक्स, केमिस्ट्री मधून नवीन आलेल्या गोष्टी वापराघला प्रत्यवाय आहे म्हटल्यावर विद्यार्थ्याना त्याचे आकलन होईनासे झोले. शासनाला समाजला आपण कल्पना करू या की आयुर्वेदातून ज्याने वनस्पतीजन्य औषधींचे तंत्र शिकून घेतलू आहे, अशा विद्यार्थ्याने जर त्याचबरोबर घ्थ्ठ्ठदद्य द्रठ्ठद्यण्दृथ्दृढ़न््र, घ्थ्ठ्ठदद्य ढ़ड्ढदड्ढद्यत्ड़द्म अशाही विषयांचा अभ्यास केला असता तर याचा भारतीय समाजाला
फार मोठा फायदा झाला असता. परंतु ज्याने आयुर्वेद शिकायचा असेल त्याने थ््रदृड्डड्ढद्धद सायन्सेस मधून आलेल्या कोणत्याही तंत्रज्ञानाचा अपयोग करायचा नाही हे शासनाच्या शिक्षण पद्धतीनेच घालून दिलेले बंधन आहे. म्हणून जे पाचशे वर्षापूर्वीच्या आयुर्वेदांत सांगितले तेच तुम्ही करायचे, मात्र त्याला नवे पोषक कांही करायचे नाही आणि जुनाट म्हणून हिणवून ध्यायचे, दुय्यम स्थान पत्करायचे हा शासनामेच जणू दंडक घालून दिला. मला आश्चर्य असे वाटते की जर चरक, सुश्रुत, वाग्भट या मंडळीनी नवे प्रयोग करायचे नाहीत. नवीन शल्य औजारे शोधायची किंवा वापरायची नाहीत, नवे लिखाण करायचे नाही असे बंधन त्यांच्या काळातील राज्य शासनाने किंवा समाज धुरीणांनी घातले असते तर आज आयुर्वेद कुठे असता?

     वैज्ञानिक, संशोधन या शब्दांबदल शासनाची किती चुकीची समजूत धोरणे आहेत तसेच शासनाच्या या धोरणांमुळे आयुर्वेदाची प्रगती कशी खुंटली ते लक्षात येण्यासाठी मी एक उदाहरण देते. समजा एका प्रवीण वैद्याने मधुमेहावर लागू पडणारे एक औषध शोधून काढले आणि त्याला एक संशोधनाचा विषय सुचला कि आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे पित्त, बाल कफ प्रकृतिच्या माणसाला हे एक औषध कसे कसे लागू पडते याबाबत आपण प्रयोग करावे. त्याप्रमाणे समजा त्याने प्रत्येक प्रकृतिचे १०० असे ३०० रोगी धेऊन प्रत्येकाला हेच औषध दिले आहे. असे समजा की सर्व रोगी बरे झाले. कफ प्रवृत्त्िाच्या माणसाला बरे होतांना लागणारा वेळ, त्या काळातील त्याची मनःस्थिती त्या काळात त्याच्यावर होणारे द्मत्ड्डड्ढ ड्ढढढड्ढड़द्यद्म किंवा त्यासाठी द्यावे लागणारे पथ्य वेगळे होते. त्याप्रमाणे वात प्रकृति पित्त प्रकृतिच्या रोग्यांबाबत वेगवेगळे निष्कर्ष निघाले. (क्षणभर असे मानले की प्रहाननुरूप असे कांही वेगवेगळे निष्कर्ष निघते नाहीत तरी देखील ते एक प्रायोगिक फाइन्डिंग ठरेल त्याला 'वैज्ञानिक' मूल्य आहे.) आता वरील प्रयोग झाल्यावर एखादा पेपर लिहून तो प्रकाशित करावयाचा असल्यास किंवा हे औषध बाजारात आणावयाचे असल्यास आणि वेगवेगळया प्रकृतिसाठी या औषधाचे वेगवेगळे डोसेस सुचवायचे असल्यास शासनाच्या क्ष्क्ग्ङ या संस्थेची मान्यता ध्यावी लागते. अशी मान्यता देत असतांना क्ष्क्ग्ङ चा नेमका रोल काय या बाबत मी क्ष्क्ग्ङ/क्क्ङऋच् या दोन्ही संस्थांकडे लेखी विचारणा केली असता त्याचे उसर मिळाले नाही. पण जे तॉडी उतर मिळाले ते मला अपेक्षित असलेले उत्तर नव्हते तसेच पटण्यासारखे ही नव्हते .

क्ष्क्ग्ङ ही आपल्या देशातील थ््रड्ढड्डत्ड़ठ्ठथ् द्धड्ढद्मड्ढठ्ठद्धड़ण् या विषयाबाबत तांत्रिक सल्ला देऊ शकणारी सर्वोच्च संस्था मानली जाते. ही संस्था दोन भूमिकांतून काम करते. एकीकडे शैक्षणिक इतर संस्थांना संशोधन करण्यासाठी उत्तेजन देणे, त्यांच्या प्रयोगांची आखणी करणे, तांत्रिक सल्ला देणे, अर्थसहाय्य पुरविणे इ. प्रोत्साहनपर भूमिका, तर दुसरीकडे कुठल्याही संस्थेने अगर व्यक्तिने  केलेल्या प्रयोगाची सत्यता प्रमाणित करणे त्यावर शिक्कामोर्तन करणे, ही ड़ड्ढद्धद्यत्ढन््रत्दढ़ ठ्ठढ़ड्ढदड़न््र ची भूमिका! ही संस्था केंद्रशासनाची असून या संस्थेला सर्वात मोठा दर्जा सन्मान असावा या साठी केंद्रशासन सर्व प्रयत्न करते. भलामोठया पगारावर मोठमोठे तज्ञ या संस्थेत नेमले जातात. त्यांचा शब्द शेवटचा मानला जातो. मात्र संस्थेच्या स्थापनेनंतर इतक्या वर्षांनी आज असे दिसून येते की या संस्थेन प्रोत्साहनपर भूमिका फक्त ठ्ठथ्थ्दृद्रठ्ठद्यण्न््र च्या संदर्भातच पार पाडली. शासनानेही या बाबत कधी सखोल विचार केला नाही. केंद्रशासनाने प्रोत्साहनपर भूमिकेतून आयुर्वेदासाठी क्क्ङऋच्, तर होमिओपॅथीसाठी क्क्ङ-, यूनानी साठी क्क्ङछग् निसर्गोपचारासाठी क्क्ङज्ञ्ग़् अशा निरनिराळ्या संस्था निर्माण केल्या. सत्यता प्रमाणित करण्याची भूमिका मात्र क्ष्क्ग्ङ कडे कायम ठेवली. यामुळे ठ्ठथ्थ्दृद्रठ्ठद्यण्न््र वगळता इतर सर्व प्रणांलीमध्ये दुरावस्था होऊन बसली. ज्या संस्थेकडे नविन संशोधनाचा विचार मांडणी करण्याची पात्रता (ड्ढन्द्रड्ढद्धद्यत्द्मड्ढ) असू शकते, ती संस्था प्रयोगांची सत्यता प्रमाणित करू शकत नाही ज्या संस्थेकडे सत्यता प्रमाणित करण्याचा अधिकार दिलेला आहे त्या संस्थेला आयुर्वेदातील संशोधन कसे असू शकते, किंवा मुळात आयुर्वेदात संशोधन असू शकते याचाय पता नाही. माझ्या मते सत्यता प्रमाणित करणारी देशात एकच संस्था असणे योग्य आहे परंतु त्याच संस्थेत निष्णात आयुवैद्यक देखील असले पाहिजेत. आज ते
तिथे नसतील तर सरकारने तसे नेमते पाहिजेत. आजच्या आयुर्वेद्यकांना आधुनिक परिभाषेत बसणारे संशोधन म्हणजे कांय ते कळत नाही अशी शासनाची तक्रार आहे ती पुष्कळशी बरोबर असू शकेल. पण मग त्यांना ने नेमके तंत्र अवगत व्हावे यासाठी शासनाने कोणते शिक्षणक्रम चालू केले कां? एकीकडे त्यांना पूरक, पोषक असे शिक्षणक्रम करायचे नाहीत दुसरीकडे त्यांची क्षमता सुधारली नाही अशी तक्रार करायची असे घडू नये. थोडक्यात क्ष्क्ग्ङ कडे अशा व्यक्ति असाव्यात ज्या आयुर्वेद एलोपॅथी या दोन्ही शास्त्रात निपुण आहेत. मात्र ही निपुणता देखील फक्त पुस्तकी नसावी तर प्रत्यक्ष रोग्यावर रोग्यांवर उपचार करून आलेली असावी. अन्यथा अशा तथाकथित तंत्राची अवस्था द्मठ्ठथ््रद्रथ्ड्ढ सोबतच्या द्रठ्ठथ््रद्रथ्ड्ढद्य वर वाचून नविन नविन औषधे देणा-या ग्ड्ढड्डत्ड़ठ्ठथ् ङड्ढद्रद्धड्ढद्मड्ढदद्यठ्ठद्यत्ध्ड्ढ सारखीच असते.

     वरील प्रयोगाबाबत क्ष्क्ग्ङ ची मान्यता कां लागते माचे मला अपेक्षित उत्तर असे होते की सत्यता प्रमाणित करणारी तीच एकमेव एजन्सी आहे म्हणून. हे उत्तर मिळाल्यास मी वरीलप्रमाणे क्ष्क्ग्ङ या संस्थेतील तत्रांबाबत कांय सुधारण आवश्यक आहे ते माझे वरील मत मांडले असते. परंतु प्रत्यक्ष मिळाालेले उत्तर पटण्यासारखे आहे, ते असे की, प्रस्तुत वैद्यकाने ड्डत्ठ्ठडड्ढद्यड्ढद्म बरा झाल्याचा निष्कर्ष काढयासाठी डथ्दृदृड्ड द्मद्वढ़ठ्ठद्ध थ्ड्ढध्ड्ढथ् तपासली म्हणजेच ठ्ठथ्थ्दृद्रठ्ठद्यण्न््र पद्धतीचा वापर केला म्हणुन त्याच्या प्रयोगाची सत्यता प्रमाणित करण्याचा इक्क फक्त क्ष्क्ग्ङ लाच असू शकतो. या उत्तरातील एक चूक जी उत्तर देणा-याला देखिल खटकली नाही ती अशी की, मुळात या प्रयोगाची मांडणी कफ, पित्त वात प्रकृतिवर ठराविक औषधांची कशी भिन्न भिन्न प्रतिक्रिया होते ते ठरविण्यासाठी होती. एथ्दृदृड्ड द्मद्वढ़ठ्ठद्ध तपासणीचे यंत्र हे ड़ण्ड्ढथ््रत्द्मद्यद्धन््र मधुन आलेले तंत्रज्ञान आहे. एखादा साधा थ्ठ्ठड.ठ्ठद्मद्मत्द्मद्यठ्ठदद्य देखील हे द्धड्ढद्रदृद्धद्यद्म काढून देतो. उलट आयुर्वेदातील त्रिदोष्ज्ञ सिद्धांत काय आहे, त्या त्या प्रकृतिचे आकलन, क्ष्क्ग्ङ मधून सत्यता प्रमाणित करणा-या लोकांना झालेले नसते. अशा वेळी त्यांचा आयुर्वेदीय संशोधना कडे बघण्याचा दृष्टिकोन हा अपूर्ण डत्ठ्ठद्मड्ढड्ड असतो. तसेच अशा व्यक्तिंना आयुर्वेदीय संशोधनाबाबत आत्मिघता नसते आणि संशाधनासाठी त्यांच्याकडून काही मार्गदर्शन देखील होऊ शकत नाही. या उलट क्क्ङऋच् मधील तथाकथित मार्गदर्शकांना द्रण्न््रद्मत्ड़द्म ड़ण्ड्ढथ््रत्द्मद्यद्धन््र मधील नवनविन प्रयोगांची आणि त्याच्या योगे वैद्यकिय तपासणीसाठी तयार झालेल्या तंत्रज्ञानाची माहिती नसते ही देखील वस्तुस्थिती आहे कारण तशी तज्ञता त्यांच्यात यावी यादृष्टि ने त्यांच्या शिक्षण क्रमांत कांहीही सुधारणा केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडुन देखील चांगले मार्गदर्शन होऊ शकत नाही.

     सर्व जगात ठ्ठथ्थ्दृद्रठ्ठद्यण्न््र मधे जे संशोधन चालते त्याची माहिती तत्काल क्ष्क्ग्ङ मध्ये उपलब्ध होते आणि त्यातुन ठ्ठथ्थ्दृद्रठ्ठद्यण्न््र चा विकास होत रहातो. आयुर्वेदात जर संशोधन करावयाचे असेल तर त्याला भरताइतका अनुकुल दूसरा देश नाही. असे असूनही आधुनिक संशोधन, आधुनिक बेसिक सायन्सेस, म्हणचे फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायलॉजी, आधुनिक जेनेटिक्स आणि त्याच जोडीला आयुर्वेद भारतीय दर्शनशास्त्र दोन्ही चांगल्या त-हेने कळते अशा तत्र माणसांची फळी आपल्या देशात शासनाला किंवा समाजाला निर्माण करता आली नाही, त्यासाठी योग्य तो शिक्षणक्रम तयार करता आला नाही ही गेल्या ५० वर्षातील आयुर्वेदाची शाकांतिका.

     भारतातील वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या विकासाकडे थोडेसे मागे वळून बघितले तर असे दिसून येते की, सांख्य इतर दर्शनशास्त्रांत माणूस कसा निर्माण झाला, विश्र्व कसे निर्माण झाले, दोघांचा आपापसांत संबंध काय? आजारपण, वृद्धत्व, मृत्यू म्हणजे काय? अशा प्रश्नांची सखोल चर्चा झाली होती. आधुनिक फिजिक्स केमिस्ट्रीच्या वाढीची सुरूवात पण अशाच प्रश्नांमधून झाली. ३/४ हजार वर्षापूर्वी ही चर्चा करत असतांना आपल्या ऋषि मुनींनी दार्शनिकांनी वापरलेली भाषा किंवा त्यांनी केलेले प्रयोग हे १६ व्या शतकातील न्यूटन किंवा २० व्या शतकातील न्यूटन किंवा २० व्या शतकातील नारळीकरांच्या भाषेपेक्षा निश्च्िात वेगळे असणार.
पण विज्ञान वाढीची बीजे त्यांत नक्की होती. पुढे त्यांचे वैज्ञानिक विवेचन मानसाशास्त्राकडे फार मोठया प्रमाणात वळले. बुद्ध जैन धर्मातील त्तवज्ञान आपल्याला मानसशास्त्रातील बरेच कांही सांगून जाते. प्रज्ञा, शील, अहिंसा, सत्यवादिता, अक्रोध, अभय या सारख्या बुद्ध जैन धर्मात मांडलेल्या संकल्पना मानसशास्त्र मानसोपचारांच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत गीतेत देखील आरोग्यासाठी पंचमहाभूतां बरोबर मन, बुद्धि अहंकार यांतून प्रकृति ठरते असे विवेचन केले आहे सन १३००-१४०० पर्यंत मानसशास्त्राप्रमाणेच गणितात देखील भारताची मोठी प्रगति झाली. ज्या अर्थी कापड उद्योग भरभराटीला होता, त्या अर्थी धागा निर्मितीचे तंत्रज्ञान, कापड रंगविण्याचे, देखिल मोठया प्रमाणात वाढले असावे. ज्योतिष स्थपत्यशास्त्रासारखे तंत्रज्ञान वाढले. मात्र घ्ण्न््रद्मत्ड़द्म किंवा क्ण्ड्ढथ््रत्द्मद्यद्धन््र सारख्या विषयात पुढे फारशी प्रगती झाली नाही.

     आयुर्वेदाचा हा हजार वर्षांचा इतिहास विचारात घेतला तर असे वाटते की पुन्हा आधुनिक फिजिक्स, केमिस्ट्री, बायलॉजी यासारखे विषय आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात योग्य त-हेने गुंफले गेले नाहीत, 'शास्त्रादपि शरदपि' अशा दोन नितांत वेगळ्या शाखांमधल्या प्रवीण असलेल्या व्यक्ती निर्माण झाल्या नाहीत तर आयुर्वेदाला मोठी उडी घेता येणार नाही. त्या दिशेने शासनाची आजची भूमिका दिसून येत नाही. समाजातील इतर विचारवंत किंवा आयुर्वेद तत्र देखील अजून अशा भूमिकेप्रत आलेले नाहीत त्यामुळे त्यांच्या कडून शासनावर योग्य दबाव आणला जात नाही. या सगळ्यासाठी मुळांत आयुर्वेदाचे पोटेन्शियल शासनाला समाजधुरीणंना समजले पाहिजे. आयुर्वेदाचा कांहीही अभ्यास करता त्याला अंधश्रद्धा म्हणून हिणवणारे पुष्कळ तज्ञ समाजांत सापडतील. परंतु सत्यशोधकाच्या भूमिकेतून त्याच्याकडे पाहणारे फार कमी. म्हणूनच असे चित्र दिसून येते की पश्च्िामी देशंत आयुर्वेदातील मूलभूत सिद्धांत समजावून घेतले जातात. निसर्गोपचार म्हणून त्यांचा गौरव होतो. आयुर्वेद हा जीवन जगण्याची कला, निसर्गाशी समरसता साधण्याचे तंत्र एक वैज्ञानिक दृष्टया तर्कशुद्ध शास्त्र म्हणून त्याचा अभ्यास केला जातो, त्यातील सिद्धांताची प्रचीति येऊन वाहवा केली जाते आणि असे ते ज्ञानपिपासू पाश्च्िामात्य स्वंयप्रेरणेने आयुर्वेद शिकून आपल्या देशांत येऊन आयुर्वेदावर नितांत सुंदर भाषणे देतात, लेखन करतात, रिसर्च करतात. असे जिज्ञासू आपल्या मेडिकल संस्थांमधून निर्माण व्हावेत ही इच्छाशक्ति देखील अजून शासनात आणि समाजांत निर्माण होत नाही. ही परिस्थिती तुम्ही आम्ही मिळून बदलली पाहिजे.

(संज्ञान में लाना है कि इसके आगे इंग्लिश के आर्टिकल में लिखा हिन्दी का लेख शायद इसी के आगे का भाग है)

     त्यांची सुखात दोन ते अडीच हजार वर्षापूर्वीचीन आहे. हा दृष्टिकोण पश्च्िामी देशांनी मांडला पसरवटन आपण मान्य करूया कि त्यांना भारतातीळ ज्ञानाची परंपरा, इतिहास व्याप्त्िा माहीन नव्हती, म्हणून त्यांनी भारतीय दर्शनशास्त्रांमधे जे वैज्ञानिक विचार संदर्भ आहेत त्यांचा मागोवा घेताच विज्ञानाचा इतिहास लिहून काढला तो लिहितांना विज्ञानाच्या वाढीत भारताचे कांहीही कन्ट्रीब्यूशन नाही असे नमूद करून ठेवले. पण आपण तरी त्यांना कधी त्यांची चूक दाखवळी कां? किंबहुना ही त्यांची चूक आपल्यालाच कधी उमगली कां? पाच-सात हजार वर्षां लिहिले ज्ञान

असलेले आपले सांख्यादि ग्रंथहीच मुळात निशानाची सुरवात होती असे आपल्याला तरी कधी वाटले किंवा पटले कां? आपण या सर्व दर्शन शास्त्राल आत्यंतिक अध्यात्माकडे नेणारे- व्यवहारात शून्य उपयोग असणारे- म्हणून अवैज्ञानिक- म्हणून टाकाऊ अशीच त्यांची संभावना केली. या सर्व ग्रंथांमधील तर्कशुद्धता, सिद्धानांची मांडणी, वैज्ञानिक दृष्टिकोण यांची दखल आपण घेतली नाही, या चुकी बद्दल पश्च्िामी इतिहासकारांनी दोष देण्यांत अर्थ नाही. या ठिकाणी हे लक्षंत ठेवायला हवे कि विज्ञानांत सिद्धांत मांडतांना तो
तर्कशुद्ध असणे महत्वाचे असते- पुढे मागे तो चुकीचा असल्याचे असणे महत्वाचे असते- पुढे मागे तो चुकीचा असयाचे ठरले तरी त्याचे वैज्ञानिक महत्व कमी होत नाही. सतराव्या शतकांत न्यूटन ने सिद्धांत मांडला कि प्रकाश हा वेगाने जाणाप्या कणांचा एक वाहृता समूह असतो. त्याच्याच काळांत हा सिद्धान्त चुकीचा ठरवल जाऊन प्रकाश तरंग-स्वरूपी असतो हे मान्य झाले. आता विसाव्या शतकाच्या सुरवातीळा प्रकाशाचे तरंगस्वरूप असतेच पण त्याबरोबर त्याल कणाचेही स्वरूप असते असा सिद्धान्त मान्य झाला आहे.

     याच दृष्टिकोणातून पाहिल्यास आपल्याला असे पटेल कि तीन-चार हजार वर्षांपूवी ज्याला दर्शन शास्त्र म्हटले गेले त्यांत देखील आधुनिक फिजिक्स, केमिस्ट्री बॉटनी यांची बीजे होतीच. विज्ञानाची तर्कशुद्धता देखील होती. त्या सिद्धान्तांतून प्रकट झालेले तंत्रज्ञान म्हणजेच अर्थशास्त्र आयुर्वेद, धनुर्वेद, स्थापथ्य, ज्योतिष्ज्ञ या सारखी शास्त्र. यापैकी आयुर्वेदाची काही आणि विस्तार सर्वांत जास्त होता आणि या शतकापर्यंत देखील टिकून राहिला. तसेच आपली उत्पादनावर भर असलेली अर्थव्यवस्था होती ती देखील टिकून राहिली. या दोन्हीं शास्त्रांच्या व्याप्त्िाचे सूत्र होते-लोकाभिमुखता आणि विकेंद्रीकरण आयुर्वेदाची सामान्य सूत्रे ही आपल्या जीवन पद्धतीतात एक भाग बनून राहिली टिकली तसेच आपली विकेंद्रित अर्थव्यवस्था पण टिकली पसरती.

........................................................   

    









































































कोई टिप्पणी नहीं: